
Articles
-
1 week ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादकशिक्षण खात्याचा कार्यभार घेतल्यापासून मंत्री दादा भुसे यांना सुखाची झोप काही दिसत नाही. शाळकरी मुलांना थेट मंत्रालयात नेऊन त्यांच्या उपस्थितीत खात्याची सूत्रे त्यांनी घेतली तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. नंतर शासनाच्या विविध निर्णयांची माहिती देतांनाही त्यांना अनेकदा आरोपांना, टीकेला सामोरे जावे लागले. आता त्रिभाषा सूत्राचा स्वीकार नव्या शैक्षणिक धोरणात केल्यानंतर राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासनादेशावर तर राज्यभर टीकेचे मोहोळ उठले.
-
1 week ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
नंदन रहाणेएखाद्या डोंगराळ खोर्यात पाऊस पडला की सगळ्या कड्यांवरून धबधबे खाली आदळू लागतात. उतारांवरून पाण्याचे लोंढे धावत सुटतात. त्यांचे झरे बनून खळखळाट करीत एकमेकांमध्ये मिसळतात. मग त्यांचे बनतात ओहोळ, तेही 5-7 मैल वाहात जाऊन आणखी मोठ्या धारेत शिरतात.
-
1 week ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
राज्यातील सर्व पुलांचे पुन्हा एकदा संरचनात्मक लेखापरीक्षण (ऑडिट) होणार आहे. म्हणजे याच्या आधीही ते अनेकदा घोषणांमध्ये झालेच आहे. फक्त प्रत्यक्ष झाल्याचे निदान जनतेला तरी माहीत नाही. कारण अशा प्रकारच्या ऑडिटचे कोणतेही निष्कर्ष शासनाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळेच बहुधा यावेळी तसा आदेश कागदावर काढला गेला आहे. तसा तो 2016 मध्येही काढला होता. मुंबई -गोवा महामार्गावरील पूल कोसळल्याने सावित्री नदीत चाळीस जणांना जलसमाधी मिळाली होती. तेव्हाही हेच आदेश काढले गेले होते.
-
1 week ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
खामखेडा । वार्ताहर Khamkhedaसटाणा-खामखेडा रस्त्यावर खामखेडा शिवारात आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात 68 वर्षीय वृद्धा जखमी होवून जागीच ठार झाली तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. मालेगाववरून कळवणकडे भरधाव जाणारी रिक्षा क्र. एम.एच.-19-ए.एक्स-9784 खामखेडा चौफुलीलगत उलटली. यात रिक्षातील शांताबाई रामदास राऊत (68, सोयगाव, ता. मालेगाव) या वृध्दा रस्त्यावर आदळून जागीच गतप्राण झाल्या. तर सुनीता कैलास मोरे, भोला कैलास मोरे, गुंडू कैलास मोरे (सर्व रा.
-
1 week ago |
deshdoot.com | Abhay Puntambekar
Maruti Chitampally passes away महाराष्ट्रातील निसर्ग आणि जंगलावरील कांदबऱ्यांनी घराघरात पोहचलेले साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →